Saturday 22 September 2018

मुंबई ते लंडन केवळ दहा आठवड्यात: या ७३वर्षीयांने रस्तेमार्गे सफर केली १९ देशातून!

मुंबई ते लंडन केवळ दहा आठवड्यात: या ७३वर्षीयांने रस्तेमार्गे सफर केली १९ देशातून!

 अलिकडेच बद्री बलदवा यांनी लंडनची स्वारी रस्त्याने १९ देशातून सफर करून पूर्ण केली, त्यांना त्यांच्या बीएमडब्ल्यूएक्स५ मधून त्यासाठी ७२ दिवस लागले. यातून त्यांनी हेच दाखवून दिले की, जग पहायचे असेल तर या रस्त्यानेच, सारे धोके पत्करून! परंतू खरे आश्चर्य तुम्ही त्यावेळी व्यक्त कराल की, ही सफर त्यांनी वयाच्या ७३व्या वर्षी आणि आपल्या धर्मपत्नी आणि दहा वर्षांच्या नातीसोबत पूर्ण केली आहे. यातून त्यांच्या या सफरीचा सार थरार आणि मौज दोन्हीची कल्पना आपणांस करता येवू शकेल. त्यांच्या महत्वाकांक्षा आणि जिद्दीच्या तसेच जिगरबाजपणाच्या गुणांचे तुम्हाला कौतूक वाटेल. धाडसी प्रवासी, बद्री यांना त्यांच्या पारपत्रावर ६५ देशांचे व्हिसा शिक्के आहेत याचा अभिमान आहे.

हे सारे सुमारे सात वर्षापूर्वी सुरू झाले, ज्यावेळी हे जोडपे लंडनहून मुंबईला हवाईमार्गे परत येत होते, बद्री यांना इच्छा झाली की, या मार्गावर प्रेक्षणीय काय आहे ते भटकत यावे आणि जवळून पहावे. व्यवसायाने पोलाद निर्यातदार आणि लेखा परिक्षक असलेल्या बद्री यांनी सक्रीयपणे याबाबत विचार करण्यास सुरूवात केली, मात्र त्यांच्या या तीन खंडातील रस्ते मार्ग करायच्या प्रवासाच्या कल्पनेला घरातील कुणी गंभीरतेने घेतले नाही. मात्र ते हटले नाहीत आणि वर्षभराच्या तयारीनंतर त्यांनी मार्च २०१७मध्ये मुंबईहून यात्रा सुरू केली.
या तिघांनी इफांळ येथे जावून तेथे आपल्या सहकारी आणि विदेशी मित्रांना सोबत घेतले. ते दररोज चारशे किमी प्रवास करत. एकदा मात्र त्यांनी एका दिवसात ९३० किमीचा मोठा ट्प्पा पार केला होता.
पूर्वोत्तर राज्यातून भारताची सीमा पार केल्यानंतर लगेचच बद्री यांनी फेसबूक वर लिहिले की, “ आम्ही सीमापार करत आहोत, शेवटी हे घडले आहे. आमच्यापैकी कुणालाच विश्वास बसत नाही की आम्ही भारताची सीमा ओलांडून कारने निघालो आहोत.आज आमचा प्रवास युरोपच्या दिशेने सुरू झाला आहे.”


खडतर विदेशी प्रवास हा काही त्यांना नेहमीचा नव्हता, आणि हा काही त्यांचा रस्तेमार्गे पहिलाच प्रवासही नव्हता. तीस वर्षांपूर्वी त्यांनी मुंबई ते बद्रीनाथ असा प्रवास केला होता. त्यांनी बेटांवरूनही प्रवास केला होता, आणि ९० अंश उत्तरेला जाणारे पहिलेच भारतीय प्रवासी असल्याचा दावा देखील ते करतात.
या यात्रेतील अनुभव कथन करताना त्यांनी काही वृत्तपत्राना सांगितले की, “ आम्ही याच समजाने निघालो होतो की चीन आणि रशियातील लोक भारतीय असल्याने आमचे काही स्वागत करणार नाहीत. मात्र आमचे सा-या ठिकाणी स्वागतच झाले.”


ही यात्रा सा-या ठिकाणी सुकरच झाली अपवाद होता तो काही देशात राहण्याची व्यवस्था व्हावी यासाठी हॉटेल मिळाले नाहीत किंवा काही ठिकाणी सुरक्षेचा धोका पत्करावा लागला. मात्र सा-या देशांत त्यांना महत्वाचे काय दिसले असेल तर, नागरी जबाबदारीचे भान आणि स्वच्छता हेच होय.
जरी हे जोडपे आता त्यांच्या नव्या यात्रेची योजना तयार करत असले तरी, बद्री यांची खरी इच्छा त्यांच्या पत्नी सोबत अंतराळात चालत जाण्याचीच आहे!



 Ravi Bhosale

Saturday 2 September 2017

त्या मुलाने आज जीवनाचा एक धडा शिकविला !

माझ्या घराजवळ बरेच दिवस मोठ्या इमारतीचे बांधकाम चालले होते.
तेथून जाताना मला रोज बांधकाम मजुरांची लहान मुले ऐकमेकांचा सदरा पकडून आगगाडीचा खेळ खेळताना दिसायची.
दररोज कुणीतरी इंजिन बनायचे आणि बाकिची मुले डबे व्हायची...

इंजिन आणि डबे रोज बदलली जायची,
पण...
फक्त अर्धी निकर घातलेला छोटा मुलगा हातातलं फडकं  फिरवत गार्ड व्हायचा...

आज न राहवून
थांबून मी त्या गार्ड होणाऱ्या मुलाला बोलावून विचारले,

"बाळ तू रोज गार्ड होतोस, तुला कधी इंजिन, कधी डबा व्हायला आवडत नाही का?"
त्यावर तो मुलगा उत्तरला...

"बाबूजी मला घालावयास सदरा नाही त्यामुळे मागच्याला धरायला काही नाही. मग माझ्या मागे कोण येणार ?"
म्हणून मी रोज गार्ड बनूनच खेळात भाग घेतो...

"हे बोलताना त्याच्या डोळ्यांत मला पाणी तरळल्याचे जाणवले...

त्या मुलाने आज जीवनाचा एक धडा शिकविला !

*आपले जीवन हे कधीच परिपूर्ण नसते. त्यात काही  ना काही कमतरता असणारच...*
*तरीही आपल्याला जीवनाचा खेळ खेळावा लागणारच.*

त्या मुलाला घालावयास सदरा नाही म्हणून आई- बापावर रागावून, रुसून रडत बसता आले असते...
पण,
*तसे न करता आहे त्यात समाधान मानून तो खेळात सहभागी झाला.*
*आणि जीवनाच्या खेळाचं अंग बनून राहिला.*

मित्रांनो चला आपल्यालाही आहे त्यात समाधानी राहून या जीवनाच्या खेळाचं अंग व्हायचे आहे.
सतत हसत खेळत रहा व जीवनाच्या खेळाचा आनंद घ्या...

*Be positive and be happy...!
🙏🌹🙏

Monday 21 August 2017

अंबानीच्या Antilla पेक्षाही मोठे घर असलेला करोडपती आज फिरतो रस्त्याने पैदल..

भारतातील सर्वात मोठी कंपनी रेमंडचे एकेकाळचे मालक, त्यांचे घर JK हाउस हे अंबानीच्या घरापेक्षाही उंच आहे पण आज तोच माणूस चाळीत राहतो रस्त्याने पैदल फिरतो , स्वतःच्या इलाज करिता हि त्याच्या जवळ पैसा नाही वाचून धक्का बसेल ना ?
हो हे खरे आहे आज कोणीही त्यांना विचारल असे का झाले तर ते म्हणतील “आपल्या मुला बाळावर प्रेम करा परंतु आंधळे प्रेम करू नका…”
या सर्वाचे कारण मुलगा गौतम सिंघानिया, १२,००० करोडची कंपनी असलेल्या रेमंड ग्रुपचा मालक सध्या गौतम सिंघानिया आहे. कामकाजातून निवृत्ती करिता विजयपत सिंघानिया यांनी आपल्या वाटणीचे कंपनीतील ३७.७ % शेअर्स गौतमच्या नावाने केले स्वतः जवळ रुपयाही ठेवला नाही आणि होत्याचे नव्हते झाले विजयपत यांना मुलाने उपकाराची जाणीव न ठेवता घरातून ७९व्या वर्षी बेदखल केले.
विजयपत सिंघानियान उंचीचे आणि विमानाचे वेड होते. त्यांच्या स्वतःच्या विमानाला ते कधी पायलट राहत नव्हता स्वतः एक वैमानिक होते विजयपत सिंघानिया.
१२ सप्टेंबर १९९८ ची गोष्ट कानपूर येथील विमानतळावर एक छोटे विमान उतरले आणि वैमानिक होते विजयपत सिंघानिया,
लंडन ते कानपूर हजारो किलोमीटरचा टप्पा त्यांनी एकट्यानी गाठला हा एक आगळावेगळा विक्रम होता. विमानतळा बाहेर हजारो लोकांची गर्दी झाली विजयपत यांचा सत्कार करायला.
अंबानी पेक्षाही मोठे घर असलेले विजयपत सिंघानिया यांना घरातून गौतमनि बेदखल केले. स्वतःच्या घरात राहण्या करिता विजयपत यांनी आता कोर्टात दावा टाकला आहे. त्यांची गाडी व ड्रायवर सुध्दा मुलांनी काढून टाकला. आज विजयपत दक्षिण मुंबईत एका चाळीत राहतात व पैदल फिरण्याशिवाय त्यांच्या कडे कुठलाही इलाज नाही.
आजपर्यंत विजयपत सिंघानिया यांनी १०० पेक्षा अधिक पल्ले व ७००० किमी पेक्षा जास्त विमान उडान केली आहे त्यांच्या करिता हवाई क्षेत्रातील सर्वाच्च पुरस्कार Fedreation Aeuronatic International तर्फे सुवर्ण पदक देण्यात आले.
१९९४ साली त्यांनी ROUND THE WORLD AIR RACE करिता स्वतःचे नावाचे नामांकन दिले होते. तत्कालीन राष्ट्रपती आर. वेंकटरमण यांनी त्याचा “एयर कमांडर” या पदवीने सन्मान केला होता. या व्यतिरिक्त भारतीय वायुसेनेच्या Squarden No. 7 चे एकमेव असैनिक सदस्य आहेत. २००६ साली त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
सिनेमातील नटसम्राट आपण पहिला पण हा आहे मुलांनी केलेल्या विश्वासघातामुळे झालेला खर्या आयुष्यातील नटसम्राट विजयपत सिंघानिया…
लेख आवडल्यास नक्की शेअर करा
आपली माणसं 





Saturday 19 August 2017

राष्ट्रीय पुरस्कार पटकाविल्यानंतर सैराटच्या नायिकेची नवी उपलब्धी!

ज्यावेळी त्यांचा सिनेमा मोठ्या पडद्यावर झळकला त्यावेळी १७ वर्षाच्या प्रेरणा एम राजगुरू ऊर्फ रिंकू हे नाव फारसे परिचित नव्हते. २०१५ मध्ये मात्र राष्ट्रीय पुरस्कारात मराठीतील लोकप्रिय सिनेमा सैराट मधील भूमिकेसाठी  विशेष समावेश म्हणून तिचे नाव जाहीर झाले, त्यावेळी ती लोकप्रियतेच्या शिखरावर होती. नुकतेच तिने शालांत परिक्षेत ६६.४० टक्के गुण घेत यश संपादन केले आहे.


मराठीमधील ब्लॉकब्लस्टर सिनेमा म्हणून तिच्या सिनेमाची इतिहासात नोंद झाली आहे. ज्याने शंभर कोटीच्या कमाईचा टप्पा गाठला आहे. ज्यात निर्मात्याकडून रिंकू आणि आकाश ठोसर या दोघांना विशेष पुरस्कार म्हणून पाच कोटी रूपये बोनस मिळाला. रिंकू याच नावाने सा-या राज्यात तिची ओळख आहे, तिला हिंदीत ८७, तर मातृभाषा मराठीत ८३ आणि इंग्रजीत ५९ गुण मिळाले आहेत. तिला विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयात सर्वात कमी गुण आहेत ४२, त्याशिवाय गणितात ४८, आणि समाजविज्ञान मध्ये ५०असे ६६.४० टक्के गुण तिला मिळाले आहेत, जी एकूण पाचशे गुणांची परिक्षा असते.


सन २०१४ मध्ये ती केवळ १४ वर्षाची शाळकरी मुलगी होती, ज्यावेळी तिने सैराटसाठी ऑडीशन दिली आणि दिग्दर्शक नागराज मंजूळे यांच्या कडून त्यांची निवड झाली. या सिनेमात तिने दुर्दम्य इच्छाशक्ती असलेल्या तरूण मुलीची आर्चीची भूमिका साकारली आहे. जी मागास वर्गीय समाजातील मुलाच्या परश्या (आकाश ठोसर) च्या प्रेमात पडते. दोघे मिळून लग्न करतात, त्यांना छान मुल असते, मात्र त्यांना ऑनर किलींगचे बळी व्हावे लागते, सैराट आता अनेक भाषातून पुन्हा तयार करण्यात आला आहे. त्यात करण जोहर यांनी तो हिंदीतही केला आहे. पंजाबी, तेलगू, तमिळ, आणि मल्याळम. यापैकी काहीमध्ये पुन्हा रिंकूने यांनी भूमिका केली आहे. त्यापैकी कन्नडा मधील मनासू मलिगे हा फेब्रूवारी २०१७मध्ये प्रदर्शित झाला. खूप मोठी तारका कमी वयात होण्याचे मानसिक ओझे असताना रिंकूला  जिजामाता कन्या शाळा या अकलूज सोलापूर येथील शाळेत जाणे अवघड झाले होते. त्यामुळे शालांत परिक्षा तिने बाहेरून दिल्याचे वृत्त आहे. २०१७च्या या परिक्षेचे निकाल नुकतेच लागले. त्यावेळी सतरा लाख विद्यार्थी परिक्षेत असताना सा-या राज्याचे लक्ष तिच्या निकालावर होते. ज्यापैकी ८८.७४ उत्तिर्ण झाले. शिवाय १९३ जणांना यावेळी शंभर टक्के गुण मिळाले आहेत.

Aapali Manasa

Friday 18 August 2017

अॅमेझॉनच्या डिलवरी बॉयने सुरू केला स्वत:चा उद्योग महिन्याला करतो लाखाची कमाई

सध्या सर्वानाच सारे काही घरपोच हवे असते, ते देखील कोणत्याही प्रकारे त्रास न होता. शेवटी आपण ज्या जगात राहतो ते सध्या गतिमान झाले आहे हेच खरे. त्याचवेळी येथे ई- कॉमर्सने ग्राहकांची ही गरज ओळखून त्यांना सहजपणे सा-या गोष्टी कशा मिळवता येतील याचा विचार केला आहे. यात अनेक स्टार्टअपने देखील सुरूवात केली आहे की, खाद्यपदार्थापासून सारे काही घरपोच देता यावे. यातील बहुतांश सध्या नागरी किंवा शहरी भागात कार्यरत आहेत, त्यामुळे अनेक छोटी मध्यम शहरे यातून वगळली गेली आहेत. हीच गोष्ट लक्षात घेवून रघुविरसिंह चौधरी, यांनी स्टार्टअप सुरू केले, जे नाश्ता आणि चहा जयपूरमध्ये घरपोच देते.

जयपूरचेच रहिवासी असलेल्या रघुवीर यांची पार्श्वभुमी गरीब घरातील आहे. घरच्या आर्थिक स्थितीमुळे त्यांना शालेय शिक्षणानंतर उच्च शिक्षण घेता आले नाही. पैसा मिळवण्यासाठी ते ऍमेझॉन सोबत डिलीवरी बॉय म्हणून काम करु लागले. जेथे त्यांना प्रतिमहिना नऊ हजार रूपये मिळत होते. त्यावेळी त्यांच्याकडे दुचाकी वाहन नव्हते, ते सायकलने प्रवास करत आणि प्रत्येक ग्राहकाला वस्तू पोहोचवित असत.
सायकलने फिरताना रघुवीर थकून जात आणि ते नेहमी चहा नाश्ता करण्यासाठी थांबत असत. चहाचे चांगले ठिकाण शोधताना त्यांना नेहमी आव्हान असायचे. त्यांना जाणवले की येथे त्यांच्यासारखेच अनेक जण होते ज्यांना दिवसभर थकल्यावर चहा नाश्ता हवा असे मात्र सहजपणे तो मिळत नसे. त्यामुळे त्यांच्या मनात असा स्टार्टअप सुरू करण्याच्या कल्पनेने जन्म घेतला.
तीन मित्रांना सोबत घेवून रघुवीर यांनी त्यांच्या कल्पनेवर काम करण्यास सुरूवात केली. त्यांनी त्यांचे नेटवर्क (जनसंपर्क)तयार  केले होतेच जे जवळचे वेंडर्स होते, त्यात शंभर नव्या वेंडर्सची भर पडली. त्यांची पुरविलेला चहा आणि नाश्ता इतका छान होता की, आता अनेक नवे वेंडर्स आहेत ते केवळ त्यांच्याकडूनच चहा नाश्ता मागवितात. यासाठी त्यांनी स्वत:चे दुचाकी वाहन विकत घेतले ती या प्रवासातील सर्वात मोठी उपलब्धी म्हणावी लागेल.
सध्या रघुवीर यांची जयपूरात चार चहा वितरण केंद्र आहेत, आणि रोज पाचशे ते सातशे जणांच्या सरासरी मागण्या ते पूर्ण करतात. ते दरमहा लाखभर रूपये यातून कमावितात. आणि अभिमानाने सांगतात की, डिलवरीसाठीच्या ‘चार बाईक्सचे ते मालक झाले आहेत’.
 Achiseekh.com

Thursday 17 August 2017

अशी बनणार लाकडी कार!

लाकडी कारसोबत आपण लहानपणी खेळलो. पण आता याच खेळण्यातल्या लाकडी कार खऱ्या अर्थानं चालवता आल्या तर..? मंडळी, आता येत्या 10 वर्षात तुम्ही स्टील, अॅल्युमिनिअमच्या पार्टपेक्षा लाकडापासून बनवलेली कार चालवू शकता. कारण जपानी संशोधक आणि कारचे इन्टर पार्टस बनवणाऱ्यांनी हे संशोधन केलं आहे.
लाकडी कार ही वजनानं हलकी असेल, मजबुतीला पाचपट असेल, शिवाय यात लाकडांचे तंतू वापरले जाणार आहेत. लाकडांच्या तंतूंचा वापर करून त्याचा प्लॅस्टिकसोबत संयोग घडवून एक मिश्रण तयार केलं जाईल, ज्याद्वारे गाडीचे अनेक पार्ट्स बनवले जातील.
हे मिश्रण स्टील आणि अॅल्युमिनिअमला उत्तम पर्याय असेल. शिवाय, याचा खर्च हा साध्या कारच्या उत्पादन खर्चाच्या पाचपट कमी असेल. पण आता या लाकडी कारनं पेट घेतला तर काय? शिवाय, लाकडांच्या तंतूंवर पाण्याचा काय परिणाम काय होईल, हे मात्र अजूनही कळलेलं नाही.
येत्या 10 वर्षांत स्टीलच्या कारपार्टसला पर्याय म्हणून लाकूड असू शकतं परंतु याला कार्बनबेस्ड मटेरियल आणि आर्थिकदृष्टया परवडणं यामुळे मोठी स्पर्धा निर्माण होईल, असंही संशोधकांचं म्हणणं आहे.
माणसानं पृथ्वीच्या पोटातून गेली कित्येक वर्षे लोह खनिज काढून घेतलं आहे. पण कधी ना कधी हा साठा संपुष्टात येणार आहे. जी गोष्ट इंधनाची, तीच खनिजाची, तेव्हा अशा पर्यायांचा विचार आतापासून केला. तर भविष्यात जगणं सुकर होईल.
फक्त या कारने झाडांच्या कत्तली होणार नाहीत आणि झाल्या तर तितकीच झाडे वाढवण्याची जबाबदारी कंपन्यांवर ठेवावी म्हणजे झालं.




Source abp Maza

Achiseekh.com

सावधान! ओप्पो, विवो, शाओमी, जियोनीचा फोन वापरताय?

भारतीय ग्राहकांचा डाटा चीन सरकार जमा करत असल्याचा भारताला संशय आहे. भारत आणि चीनमध्ये सुरु असलेल्या डोकलाम वादाचीही याला पार्श्वभूमी आहे.

 

  तुम्ही जर चिनी कंपनीचा मोबाईल वापरत असाल, तर तुमच्यासाठी धोक्याची सूचना आहे. तुमची वैयक्तिक माहिती थेट चीन सरकार चोरत असल्याची शक्यता आहे. मोदी सरकारला याबाबत शंका आल्यामुळे त्यांनी थेट चिनी कंपन्यांना नोटीस बजावली आहे.
ओप्पो, विवो, शाओमी, जियोनी यासारख्या चिनी मोबाईल कंपन्या भारतात स्मार्टफोन तयार करतात आणि इथेच त्यांची विक्रीही करतात. या कंपन्यांच्या माध्यमातून भारतीय ग्राहकांचा डाटा चीन सरकार जमा करत असल्याचा भारताला संशय आहे. भारत आणि चीनमध्ये सुरु असलेल्या डोकलाम वादाचीही याला पार्श्वभूमी आहे.
भारतात विक्री होणारे बहुसंख्य स्मार्टफोन्स हे चिनी कंपन्याकडून तयार केले जातात. यामुळेच चीन सरकार भारतीयांची माहिती हॅक करण्याची भीती भारत सरकारला भेडसावत आहे.
काँटॅक्ट लिस्ट, एसएमएसच्या माध्यमातून ग्राहकांची वैयक्तिक माहिती चोरली जात असल्याचा संशय आहे. त्यामुळे ओप्पो, विवो, शाओमी, जियोनी यासारख्या चिनी मोबाईल कंपन्यांना सरकारने नोटीस बजावली आहे.
Source : abp Maza

Thank you

Achiseekh.com

‘कुठं कुठं जायचं हनिमूनला’वर सनी लियोनीचा ठेका

आपल्या दिलखेचक अदांनी साऱ्यांनाच घायाळ करणाऱ्या सनी लियोनीचा ‘कुठं कुठं जायचं हनिमूनला’ हे गाणं रिलीज झालं आहे.

  
बॉलिवूडची बेबी डॉल अर्थात सनी लियोनी आता मराठी सिनेमात दिसणार आहे. आगामी ‘बॉईज’ सिनेमाच्या एका गाण्यात सनी लियोनी थिरकणार आहे. या गाण्याचा व्हिडीओ रिलीज करण्यात आला आहे.
आपल्या दिलखेचक अदांनी साऱ्यांनाच घायाळ करणाऱ्या सनी लियोनीचा ‘कुठं कुठं जायचं हनिमूनला’ हे गाणं रिलीज झालं आहे. हे गाणं ‘बॉईज’ सिनेमातील आहे.
‘कुठं कुठं जायचं हनिमूनला’ आणि ‘मेरा बाबू’ ही दोन गाणी एकत्र करुन नवं गाणं तयार करण्यात आलं आहे. संगीतही ठेका धरायला लावणारं असल्याने प्रेक्षकांच्याही पसंतीस पडेल, यात शंका नाही. त्यात सनी लियोनीने अफलातून डान्सही केला आहे.


सैराटमधल्या ‘झिंगाट’मधून बाहेर पडत आता प्रेक्षक सनी लियोनीच्या ‘कुठं कुठं जायचं हनिमूनला’वर थिरकताना दिसली, तर आश्चर्य वाटून घेऊ नका.

Source : Achiseekh.com

 

Tuesday 15 August 2017

आपण 71व्या स्वातंत्र्यदिन साजरा केलो परंत

आज आपण 71व्या स्वातंत्र्यदिन साजरा केलो परंतु या भारतामध्ये अजून ही विचाराची गुलामगिरी आहे.....तुमी प्रकट पणे विचार व्यक्त केला की, ही व्यवस्था तुमाला स्वाभिमानाने नीट जगू देत नाही
आम्ही 150 वषँ ची गुलामगिरी सहन केली परंतु आज माञ चिञ वेगळे आहे.....या भारत देशात दोन प्रकाराचे लोक आहेत एक ज्याचे हातावर पोट आहे आणि दुसरे ज्याचे पोटावर हात आहे....ही परिस्थिती आहे....तरी आपण स्वातंत्र्य आहोत का???हा एक चिंता नव्हे तर चिंतन प्रश्न आहे....सहित्यरत्न आण्णाभाऊ म्हणतात," ये आज़ादी झूठी है! आज भी देश की जनता भूखी है!!!  हे वास्तविक रूप आहे आजच्या स्वातंत्र्यदिनाचे..................
Source : achiseekh.com

Monday 14 August 2017

कपड्यांवरून किंवा बाह्य रुपावरून त्याची पारख करायची घातक सवय

अमेरिकेतील जगप्रसिद्ध हॉर्वर्ड विद्यापिठाच्या प्रेसिडेन्टना भेटण्यासाठी म्हणून एक वृद्ध जोडपे अपॉईमटमेन्ट न घेता भेटायला आले. त्या जोडप्याचा वेश नुसताच साधा नव्हता तर गबाळा पण होता. म्हातारबाईंनी घातलेला फ्रॉक अगदी साधा, चुरगळलेला आणि थोडासा मळलेला हेता. तर म्हातारबुवांनी घातलेला सूट पण घरी शिवलेली, ढगाळ, गबाळा आणि इस्त्री न केलेला होता. प्रेसिडेन्टच्या केबिनबाहेर पॉश काऊंटरवर बसलेल्या सेक्रेटरीकडे ते जोडपे आले.

‘आम्हाला प्रेसिडेन्ट साहेबांची फक्त दहा मिनिटेच भेट हवी आहे! मिळेल का?’ त्या आजीबाईंनी नम्रपणे विचारले.

त्या जोडप्याचा तो गबाळा अवतार बघून ती सेक्रेटरी थोडीशी नाराज झाली. तिला वाटले हे एक गरीब जोडपे आहे. एकतर भीक मागायला, म्हणजे डोनेशन मागायला आले असेल किंवा मुलाच्या फींमध्ये सवलत मागायला आले असेल. अशा लोकांना कसे टोलवायचे हे तिला चांगलेच ठाऊक होते.

‘प्रेसिडेन्ट साहेब सध्या कामात आहेत! ते लगेच भेटू शकणार नाहीत!’ तिने उर्मटपणे सांगीतले. तिला वाटले तिच्या या उत्तराने ही ब्याद एकदाची टळेल.

‘ठीक आहे! आम्ही वाट बघू! पण त्यांना भेटूनच परत जाऊ!’ त्या आजी नम्रपणे म्हणाल्या आणि ते जोडपे तेथे ठेवलेल्या सोफ्यावर जाऊन बसले.

प्रेसिडेन्ट साहेब खरच बिझी असावेत. दोन चार वेळा ते केबिनच्या बाहेर आले. त्यांनी ऊंची सूट घातला होता, पायात चकचकीत बूट होते, चेहेर्याहवर अधिकाराचा रुबाब होता. त्यांनी त्या म्हातार्याि जोडप्याकडे पाहिले न पाहिल्यासारखे केले पण त्यांची काही दखल घेतली नाही. बघता बघता दिवस संपायला आला. संध्याकाळ व्हायची वेळ आली. तरी सुद्धा ते वृद्ध जोडपे बसूनच होते. शेवटी त्या सेक्रेटरीलाच दया आली असावी.

‘ते वृद्ध जोडपे सकाळपासून तुम्हाला भेटायची वाट बघते आहे. तुम्ही त्यांना पाच मिनीटे तरी भेटावेत’ सेक्रेटरीने प्रेसिडेन्टला सांगीतले. प्रेसिडेन्टला घरी जयची घाई होती तरी पण केवळ पाच मिनिटेच भेटायला ते एकदाचे तयार झाले!

‘काय काम आहे?’ प्रेसिडेन्ट साहेब केबिनच्या बाहेर आले आणि त्या वृद्ध जोडप्याला विचारू लागले. चेहेर्यासवर बर्यानपैकी नाराजी हेतीच.

‘हे पहा! आमचा एकुलता एक मुलगा काही वर्षांपूर्वी या विद्यापिठाचा स्टुडन्ट होता. आता दुर्दैवाने तो नाही. विद्यापिठाच्या आवारात त्याचे एखादे स्मारक असावे असे आम्हाला वाटते. म्हणून आम्ही तुम्हाला भेटायला आलो!’ ती वृद्ध महिला नम्रपणे म्हणाली

‘स्मारक? कसले स्मारक? म्हणजे तुम्हाला ईथे त्याचा पुळा वगैरे उभारायचा आहे काय? ते शक्य नाही.  आम्ही जर मृत पावलेल्या प्रत्येक माजी विद्यार्थ्याचा पुतळा येथे उभारू लागलो तर आमच्या युनिव्हर्सिटिचे स्मशान व्हायला वेळ लागणार नाही!’ प्रेसिडेन्ट साहेब काहिश्या वैतागानेच म्हणाले.

‘नाही नाही! तसे नाही!’ त्या आजीबाई परत बोलू लागल्या, ‘आम्हाला येथे त्याचा पुतळा वगैरे उभारायचा नाही. त्याचे स्मारक म्हणून तुमच्या विद्यापीठाला एखादी चांगली ईमारत वगैरे बांधुन देण्याचा विचार आहे!’

त्या आजीबाईंच्या चुरगळलेल्या, मळक्या कपड्यांकडे बघून प्रेसिडेन्ट साहेबांना हसूच आले.’ ईमारत? ईमारत बांधायला किती पैसे लागतात ठाऊक आहे का? तुम्हाला म्हणून सांगतो. या विद्यापिठाच्या कॅम्पसमधील ईमारती बांधायला आम्हाला 75 लाख डॉलर्स लागले!’ प्रेसिडेन्ट साहेब सांगत असतातना या जोडप्याच्या खिशात 75 डॉलर्स तरी असतील की नाही याची त्यांना खात्री वाटत नसावी असा त्यांचा चेहेरा होता.

‘युनिव्हर्सिटी काढायला एवढेच पैसे लागतात?’ त्या आजीबाई हळूच त्या म्हातारबुवांच्या कानात कुजबुजल्या. प्रेसिडेन्ट साहेबांचे आभार मानून मिस्टर आणि मिसेस लेलॅन्ड स्टॅनफोर्ड नावाचे हे वृद्ध जोडपे तेथून बाहेर पाडले. पुढे ते कॅलिफोर्निया राज्यातील पालो आल्टो या गावी आले आणि स्वतःच्या मुलाच्या नावाने युनिव्हर्सिटी चालू केली. हीच आहे जगप्रसिद्ध स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी!

आज स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी ही जगातील नंबर एकची युनिव्हर्सिटी म्हणून ओळखली जाते. 8180 एकर जमीनीवर या युनिव्हरसिटिचा पसारा पसरला आहे. या युविव्हर्सिटिचे वार्षिक बजेट भारत सरकारच्या वार्षिक बजेटच्या तिपटीहून जास्त असते. जगात सगळ्यात जास्त ‘नोबेल लॉरिएट्स’ (नोबेल पारितोषिक विजेते) या युनिव्हर्सिटीसाठी काम करतात. आज या युनिव्हिसिटीत 32 नोबेल लॉरियटस प्रोफेसर म्हणून काम करत आहेत.

अनेक जणांना माणसाची पारख ही त्याच्या कपड्यांवरून किंवा बाह्य रुपावरून करायची सवय असते. पण अनेकदा ही सवय घातक ठरते. पॉश किंवा फॅशनेबल कपडे घालणारा माणूस हा खर्याण अर्थाने    श्रीमंत किंवा चांगल्या कॅरॅक्टरचा असतोच असे नाही. तसेच सामान्य कपडे घालणारा, सामान्यपणे रहाणारा माणुस हा गरीब, दळिद्री किंवा ‘लो कॅरॅक्टर’चा असतो असेही नाही. अनेक वेळा आपण माणसाच्या कपड्यांवरून किंवा बाह्य रुपावरून चुकीची पारख करतो आणि एखादा चांगला मित्र, हितचिंतक किंवा गि-हाईक हातचे घालवून बसतो.

माणसाच्या

कपड्यांवरून किंवा बाह्य रुपावरून त्याची पारख करायची घातक सवय, असल्यास, ती सोडून द्या!

अर्थात असे करायचे की नाही हे तुमचे तुम्ही ठरवा!

Tuesday 11 July 2017

आपल्याला नक्की काय हवंय?

एक अमेरिकन माणूस मेक्सिकोत सुटीवर जातो.
एका छोट्या शांत गावात. गावात एक सुंदर
झुळझुळती नदी असते. त्यात एक तरुण नावाडी
रोज दिसतो. मासेमारी करत असतो. शांत बसलेला
असतो.

एका दुपारी अमेरिकन त्या तरुणाला विचारतो, ‘‘हे
इतके सुंदर मासे पकडायला तुला किती वेळ
लागला?’’

तो मुलगा म्हणतो, ‘‘लागले असतील काही तास.’’

‘‘पण मग तू रोज काहीच तास का काम करतोस.
जास्त काम कर, जास्त मासे पकड.’’ - अमेरिकन
त्याला सांगतो.

‘‘पण हे एवढे मासे पुरेत. माझं आणि माझ्या
घरच्यांचं भागेल तेवढय़ात, मग जास्त पकडून काय
करू?’’ - तो तरुण विचारतो.

‘‘ते ठीक आहे, पण बाकीच्या वेळेचं तू करतोस
काय?’’

‘‘मी मस्त झोप काढतो. माझं छोटं मूल आहे,
त्याच्याशी खेळतो. बायकोबरोबर फिरायला जातो,
गप्पा मारतो. गावात चक्कर मारतो. मित्रांना भेटतो.
मस्त गप्पा होतात. सुख-दु:ख समजतात. कधीकधी
मी गिटार वाजवतो, गातो. चांदणं पाहतो.’’

हे सगळं ऐकून अमेरिकन वैतागतो. म्हणतो,

‘‘माझ्याकडे बघ, मी हार्वर्डमधून एमबीए केलं
आहे. मी उत्तम बिझनेस मॉडेल बनवून देऊ शकतो.
मी तुलाही एक मॉडेल बनवून देतो. एकदम फुकटात.
फक्त तुला रोज सकाळी लवकर मासेमारीला जावं
लागेल आणि बराच जास्त वेळ काम करावं लागेल.
मग म्हणजे तू जास्त मासे पकडून आणशील, ते
विकून तुला जास्त पैसे मिळतील.

मग तू मोठी बोट
विकत घेऊ शकशील! म्हणजे अजून जास्त मासे
पकडता येतील, त्यातून अजून जास्त पैसे मिळतील.
मग आणखी एक बोट घेशील, मग अजून जास्त मासे,
मग अजून एक बोट. बघ इमॅजिन करून बघ!’’

स्वत:च्याच बिझनेस प्लॅनवर खूश होत अमेरिकन
एक्सपर्ट बोलत होता.

मग अजून एक्साईट होऊन म्हणाला, ‘‘एखादा ट्रकच
घे मग, डायरेक्ट शहरात मासे पाठव. काही मासे तर
तू एक्सपोर्टही करू शकशील. काय सांगावं, तू एक
दिवस हे छोटं मेक्सिकन खेडं सोडून, थेट अमेरिकेत
लॉस एंजेलिस, न्यू यॉर्क सारख्या शहरात जाऊन
राहशील. एक मोठा उद्योगपती होशील. बघ ना बघ,
केवढी मोठी स्वप्न तुझी वाट पाहत आहेत.’

हे सारं ऐकून थक्क झालेला मेक्सिकन तरुण म्हणाला,

‘‘पण हे सारं घडायला साधारण किती वेळ लागेल?’’

‘‘तू खूप मेहनत केलीस, तर १५-२0 वर्षांत हे स्वप्न
पूर्ण होऊ शकेल!’’

‘‘आणि मग पुढे?’’

‘‘मग पुढे काय, तू तुझ्या कंपनीचे शेअर्स विक,
अजून श्रीमंत हो.’’

‘‘पण त्या पैशाचं मी करू काय?’’

‘‘मस्त रिटायर्ड हो, काम कमी कर! एखादं नदीकाठी
फार्म हाऊस घे, जिथं तुला शांतपणे राहता येईल,
उशिरापर्यंत झोपता येईल, गिटार वाजवता येईल,
गाता येईल, सुखानं राहता येईल!’’

मेक्सिकन तरुण म्हणाला, ‘‘मग आत्ता मी काय
करतोय?’’
***
😝😝😝

मुद्दा काय, जरा स्वत:लाच नीट विचारा की,
आपल्याला नक्की काय हवंय? कशासाठी चाललीये
ही तगमग? काय सांगावं, जे तुम्हाला हवं, ते
तुमच्या हाताशी, तुमच्या जवळ असेल, पण कदाचित
तुम्हालाच ते दिसत नाही.

त्यामुळं प्लीज एकदा
विचारा स्वत:ला, मला नेमकं काय हवंय!!

Friday 7 July 2017

आई तुझी खुऽऽऽऽऽऽप आठवण येते......



आई तुझी खुऽऽऽऽऽऽप आठवण येते......
आता माझी सकाळ 5.30 ला होते आणि
रात्र 12 वाजता.......
तेव्हा आई तुझी खूप आठवण येते. ..
..
..
सगळ्यांना गरम गरम जेवायला वाढते
आणि स्वतः मात्र शेवटी थंड जेवण जेवते...
तेव्हा आई तुझी खूप आठवण येते. ..
.
.
जेव्हा सासरी कुणी आजारी पडते..
तेव्हा त्यांच्या सेवेसाठी लगेचच हजर होते..
पण जेव्हा मला बरे नसते तेव्हा
स्वतः ची काळजी स्वतःच घेते....
तेव्हा आई तुझी खूप आठवण येते. ..
..
..
रात्री सगळे झोपल्यावर त्यांना
आठवणीने पांघरून घालते
पण जेव्हा मला पांघरूण घालायला
कुणीही नसते....
तेव्हा आई तुझी खूप आठवण येते. ..
.
.
सगळ्यांच्या गरजा पूर्ण करता करता
स्वतः लाच विसरते..
पण मन मोकळं करायला जवळ
कुणीही नसते...
तेव्हा आई तुझी खूप आठवण येते. ..
..
..
कदाचीत हीच कहानी लग्नानंतर
प्रत्येक मुलीची होत असेल.....
लग्नाअगोदर प्रत्येक मुलगा मुलीला
वचन देतो...
लग्न झाल्यावर सासरी तुला आईची
आठवण येउ देणार नाही......
पण तरीही का ???.........
आई तुझी खुऽऽऽऽऽऽप आठवण येतेय ग...

-आपली माणसं 

Friday 30 June 2017

एका माणसाचं निधन होतं..



एका माणसाचं निधन होतं..

हे त्याच्या लक्षात येतं जेव्हा साक्षात भगवंत हातात एक गाठोड़ घेऊन त्याच्या समोर प्रगटतात.
भगवंत आणि त्या माणसामधील संवाद...
भगवंत -
वत्सा, चल आधीच उशिर झालाय !
माणूस -
पण देवा मला तर तुम्ही फार लवकर आणलंत. मला आणखी खुप काही करण्याची इच्छा आहे.
भगवंत -
माफ कर, अगोदर च फार उशीर झाला आहे.
माणूस -
पण भगवंता, ह्या गाठोडयात काय आहे ?
भगवंत -
जे आहे ते तुझंच आहे !
माणूस -
माझं म्हणजे माझ्या वस्तू, कपडे पैसे.....???
भगवंत -
ते काही नाही कारण त्या सर्व भुतलाशी संबंधित आहेत.
माणूस -
माझ्या आठवणी ?
भगवंत -
त्या काळाशी संबंधित आहेत.
माणूस -
माझं कर्तृत्व...?
भगवंत -
नाही ते परिस्थितीशी संबंधित आहे.
माणूस -
माझे मित्र आणि परिवार..?
भगवंत -
नाही वत्सा ते तर तुझ्या प्रवासातील सोबती होते..
माणूस -
माझी पत्नी व मुलं..?
भगवंत -
ते तर तुझ्या हृदयात आहेत.
माणूस -
मग माझं शरीर आहे का त्या गाठोडया मधे???
भगवंत -
नाही, नाही ते तर राख झालं..
माणूस -
मग नक्की माझा आत्मा असेल.....
भगवंत -
वत्सा तु परत चुकलास तुझा आत्मा तर माझ्याशी संबंधित आहे...
माणसाच्या डोळ्यातून आता तर अश्रु ओघळतात.
त्याने भगवंताच्या हातातून ते गाठोडं घेतलं आणि मोठ्या आशेने उघडून बघितलं तर काय .......
रिकाम होतं ते...
निराश होऊन डोळ्यातील अश्रु पुसत
माणूस -
म्हणजे माझं स्वता:चं काहीच नाही ?
भगवंत -
अगदी बरोबर, तुझ्या मालकीच कधीच काही नव्हतं.
माणूस -
मग त्या सगळ्याचा अर्थ काय ??
जीवन हे क्षणभंगुर आहे..
फक्त. जगा..
प्रेम करा..
माणसं जोड़ा...

10 एकर जमीन विकली, पठ्ठ्याने गावासाठी धरण बांधलं

10 एकर जमीन विकली, पठ्ठ्याने गावासाठी धरण बांधलं


अकोला जिल्ह्यातील संजय तिडके या शेतकऱ्याने जिद्दीच्या जोरावर चक्क छोटं धरण बांधलं आहे. यामुळे इथली शेकडो एकर जमीन ओलीताखाली येणार आहे. विशेष म्हणजे सरकारी यंत्रणेने वारंवार खोडा घालून हे काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला. पण तिडकेंनी आपले भागिरथ प्रयत्न थांबले नाहीत.

इथलं शिवार जलयुक्त करण्याची जिद्द, दुष्काळाला हरवण्याची जिद्द, सगळीकडे हिरवळ निर्माण करण्याची जिद्द आणि संजय तिडके यांच्या याच जिद्दीतून हा बंधारा उभा राहिला आहे.

सांगवी दुर्गवाडाच्या संजय यांची 80 एकर जमीन. दरवर्षीच्या पावसात पीक आणि माती वाहून जायची. तर उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या झळा. यावर कायमचा पर्याय म्हणून शिरपूर पॅटर्नचा बंधारा बांधण्याचा निर्णय झाला. आसपासच्या शेतकऱ्यांनीही साथ दिली. काम सुरुही झालं. मात्र अवैध वाळू उपसा करण्याचं कारण देत प्रशासनाने कामात खोडा घातला.

दरवर्षीचा प्रश्न सोडवण्यासाठी बंधाऱ्याचं काम सुरु केलं. मात्र अवैध वाळू उपसा करता असं सांगत प्रशासनाने काम थांबण्याचा इशारा दिला. माझ्याकडे रॉयल्टी आहे तरी हा खोडा, असं संजय तिडके म्हणाले.
प्रशासनाच्या भितीपोटी शेतकऱ्यांनी साथ सोडली, काम थांबलं. मात्र अशातही ध्येयवेड्या संजय यांनी माघार घेतली नाही. त्यांनी स्वत:ची दहा एकर जमीन विकली. पैसा उभा केला आणि थांबलेलं काम पुन्हा सुरु झालं.
सध्या 18 फूट उंच आणि 260 फूट लांब भिंतीचं काम पूर्ण झालं आहे. खोलीकरणाचं काम अंतिम टप्प्यात आहे. या कामासाठी आतापर्यंत 20 लाख खर्च झाले आहेत.

सगळ्यांनी साथ सोडली तरी यावर संपूर्ण गावाचा हक्क आहे. सर्वांनी फुकट पाणी घ्या. पण आता मला माहित आहे की या कामावर सरकार आयत्या पिठावर रेषोट्या ओढायला येईल, अशी उद्विग्न प्रतिक्रिया संजय तिडके यांनी दिली.

शेयर करा

Thursday 15 June 2017

रक्तात कधीच धर्म-जात नसते

मी : डॉक्टर मला हिंदू रक्ताच्या दोन पिशव्या पाहिजेत.
.
.
डॉक्टर : हिंदू रक्त ? ते काय असतं ? तुम्ही रक्तगट सांगा ते रक्त मि
ळेल.
.
.
मी : बी पॉजिटीव (B+) हिंन्दू.
डॉक्टरः आमच्याकडे फक्त B+ रक्तगटाचं रक्त मिळतं.
.
.
मी : अहो... डॉक्टर साहेब माझा मित्र हिंन्दू आहे तर मग B+ हिंन्दू रक्त द्यायला नको का?
.
.
डॉक्टर : तुम्ही वेडे आहात का? रक्तात कसलं आलयं हिंन्दू-मुस्लिम-बुध्द-सिख-जैन... रक्त घ्यायचं असेल तर घ्या नाही तर इथून चालते व्हा.
.
.
मी : केस पेपर डॉक्टरच्या तोंडा समोर धरले आणि म्हणालो हे कशाला लिहलंय, पेशन्ट इनफोरमेशनमध्ये धर्म, जात ?
.
.
डॉक्टर : (घामाघूम होऊन) अहो... सिस्टम आहे तसं लिहावं लागतं..
.
.
मी : मग असली सिस्टम बदला ना..कशाला शिकून डॉक्टर झालात फक्त पैसा कमवायला.. बाळ जन्माला आलं कि, तुम्ही उच्च शिक्षित लोक इकडे जात-धर्म टाकता आणि बाळाला घरी घेऊन गेलं कि गोत्र, नक्षत्र, नाडी टाकतात. मग तो माणुस जन्मा पासून ते मृत्यु पर्यंत्त वाहतो नको त्या फालतू गोष्टीच ओझं....
.
.
डॉक्टरांनी पैसे घेतले. B+रक्त गटाच्या रक्ताच्या पिशव्या माझ्या हातात दिल्या आणि शांतपणे खाली मान घालुन माझ्या समोरून निघून गेले.
.
.
मित्रांनो, माणसाला माणुस म्हणुन जगु द्या आणि जगा...
उगाच नको त्या गोष्टीचा अहंकार बाळगू नका.
.
.
*रक्तात कधीच धर्म-जात नसते*
.
.
समजुन घ्या आणि समजुन द्या
मानवता हाच खरा धर्म आहे।

Popular Posts